महाराष्ट्र शासनाने “विकसित महाराष्ट्र २०४७” असे उद्दिष्ट ठेवले असून त्याचा आराखडा निर्माण करण्याचे काम चालू आहे. सदर आराखडा अधिकाधिक व्यापक व समावेशक व्हावा ह्यासाठी तो लोकसहभागातून निर्माण करण्याचे ठरविले आहे. यानुषंगाने नागरिकांकडून सूचना, कल्पना, संकल्पना मागवल्या जात आहेत…..
या अनुषंगाने मराठी भाषा विभागातर्फे “मराठी भाषेसाठी” मसुदा तयार करण्याचे काम सुरु आहे. तरी मराठी भाषा सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने आपल्या काही सूचना, कल्पना, प्रकल्प, विचार असतील तर त्या मराठी भाषा विभागाच्या sec.marathibhasha@maharashtra.gov.in या ई-मेल आयडी वर दि.१५.०६.२०२५ पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन आपणांस करण्यात येत आहे.