भारतीय आर्यसभा : हा पक्ष आर्य समाजाची राजकीय आघाडी मानला जातो. २१ नोव्हेंबर १९७० रोजी पक्षाचे प्रमुख प्रवर्तक स्वामी इंद्रवेश यांनी निवडणूक जाहीरनाम्यातून पक्षाची विचारप्रणाली प्रसृत केली. वेदाच्या सिध्दांताप्रमाणे आर्य राष्ट्राची स्थापना, अखंड हिंदुस्थानच्या एकीसाठी प्रयत्न, देवनागरी लिपीचा आणि हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून अनिवार्य वापर, सर्वांना सैनिकी शिक्षण, गोहत्याबंदी, मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण आणि सु.१२ हेक्टरपर्यंत जामीन मालकीची कमाल मर्यादा, हा त्यांच्या कार्यक्रमाचा भाग होता. पक्षाचे अध्यक्ष स्वामी अग्नीवेश यांनी आर्यसभा ३० मार्च १९७७ रोजी जनता पक्षात विलीन केली.

संदर्भ :

  • मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.